उद्यापासून होणार १० वी च्या परीक्षेला सुरवात,पेपरला जातांना घ्या ‘ ही ’ काळजी..
इयत्ता १०वी ची (३ मार्च) उद्यापासून सुरू होत आहे. राज्यातील १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थी परीक्षा देणार आहे. गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही हॉल तिकीट ऑनलाइन मिळणार आहे. परीक्षा केंद्रावर जातांना हॉल तिकीट आणि आपले आयडी कार्ड घेऊन जाने अनिवार्य आहे. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी राज्यभरात सुमारे २७३ भरारी पथके नेमण्यात आली आहे.
आपण वर्षभर केलेल्या अभ्यासाचं फळ मिळवायचं असेल तर तुम्हाला आपला पेपर चांगला सोडवावा लागेल. खूप तयारी करूनही परीक्षेच्या दिवशी गडबड होऊ नये म्हणून परीक्षा केंद्रावर लवकर पोहचा. परीक्षा केंद्रावर जातांना परीक्षेसाठी आवश्यक असणार्या सर्व वस्तु आपल्या सोबत ठेवा. आणि पेपर कसं सोडवायचा याचे नियोजन करूनच पेपर सोडवा. म्हणजे तुमचा पेपर चांगला सोडवता येईल.
परीक्षेला जाणार्या विद्यार्थ्यांसाठी सूचना
• परीक्षेच्या केंद्रावर लवकर पोहचा.
• पेपर सोडवितांना गडबड करू नका.
• सुटसुटीत व मुद्देशीर पेपर सोडवा ,खोडतोड करू नका.
• वेळेचे नियोजन करून पेपर सोडवा.
