भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ४९ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले आहे. बर्मिंगहॅम येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. मीराबाईने राष्ट्रकुल स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावले आहे. तिने टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये सुवर्णपदकही जिंकले आहे. तिने स्नॅचमध्ये ८८ किलो वजन उचलले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये या खेळाडूने स्नॅचमध्ये ८४ किलो वजन उचलले. यानंतर तिने पहिल्याच प्रयत्नात क्लीन अँड जर्कमध्ये १०९ किलो वजन उचलले.
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने आतापर्यंत तीन पदके जिंकली असून तिन्ही पदके वेटलिफ्टिंगमध्ये आली आहेत. ३० जुलै रोजी संकेत महादेव सरगरने पुरुषांच्या ५५ किलो गटात रौप्य पदक जिंकले. त्यानंतर गुरुराजा पुजारीने ६१ किलो गटात कांस्यपदक जिंकले. कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासातील वेटलिफ्टिंगमधील भारताचे हे १२८ वे पदक आहे.
सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीराबाई चानूचे अभिनंदन केलंय. “असाधारण मीराबाई चानूने पुन्हा एकदा भारताला गौरवलं! बर्मिंगहॅम गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकून नवीन कॉमनवेल्थ विक्रम प्रस्थापित करताना प्रत्येक भारतीय आनंदी आहे. तिचे यश अनेक भारतीयांना, विशेषत: नवीन खेळाडूंना प्रेरणा देते.” असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत मीराबाई चानूचे अभिनंदन केले.
@The Hitavada
यशोगाथा: MPSC( महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग) परीक्षेत नागभीड तालुक्यातील 2 युवकांची उत्तुंग भरारी
नागभीड तालुक्यातील ओवाळा या लहान गावातून स्पर्धा परीक्षेत 2 युवकांची उत्तुंग भरारी; एक राज्य कर निरीक्षक तर दुसरा पोलीस उपनिरीक्षक. ...
-
महाराष्ट्र राज्य माध्य मिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च मध्ये इ.१० वी साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे वि...
-
इयत्ता ५वी ते १२ वी ची वार्षिक परीक्षा सुरु होत आहे.या पार्श्वभूमीवर विद्यार्थी,पालक आणि शिक्षक यांना मानसशास्त्रीय मार्गदर्शन क...
-
शेतकऱ्याचा मुलगा सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर ● शाळेसाठी रोज १० किमी पायपीट, कर्ज काढून शिकत झाला IAS अधिकारी ●वीर प्रताप सिंह राघव सहाय्यक ...